GST 2.0 सुधारणा लागू केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे देशाला पत्र


नवी दिल्ली : भारतात GST 2.0 सुधारणा सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी सुधारणा लागू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात पंतप्रधान मोदींनी 'जीएसटी बचत महोत्सवाचा' उल्लेख केला आहे. या उत्सवामुळे मध्यमवर्गीयांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. पत्राद्वारे पंतप्रधान मोदींनी देशाला नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण तुम्हा सर्वांसाठी आनंद आणि समृद्धी घेऊन येवो अशी मी प्रार्थना करतो, असे मोदींनी पत्रात पुढे नमूद केले आहे.





पंतप्रधान मोदींनी सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी देशाला उद्देशून लिहिलेले पत्र एक्स (ट्विटर) वर शेअर केले आहे. या पत्रात ते म्हणतात, माझ्या प्रिय देशवासियांनो, शक्तीपूजेचा सण असलेल्या नवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. मी प्रार्थना करतो की हा सण तुमच्या सर्वांना आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. या वर्षी, सणांमध्ये आपल्याला आणखी एक भेट मिळत आहे. सोमवार २२ सप्टेंबरपासून पुढील पिढीतील GST सुधारणांच्या अंमलबजावणीसह, देशभरात 'GST बचत महोत्सव' सुरू झाला आहे. या सुधारणांचा फायदा शेतकरी, महिला, तरुण, गरीब, मध्यमवर्गीय, व्यापारी, लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांना होईल. नवीन जीएसटी सुधारणांमध्ये आता फक्त दोन मुख्य स्लॅब असतील हे उल्लेखनीय आहे. अन्न, औषधे, साबण, टूथपेस्ट आणि इतर अनेक वस्तूंसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आता करमुक्त असतील किंवा सर्वात कमी ५% स्लॅबमध्ये येतील. घर बांधणे, कार खरेदी करणे, बाहेर जेवणे किंवा कुटुंबासह सुट्टी घालवणे यासारखी स्वप्ने पूर्ण करणे आता सोपे होईल. आरोग्य विम्यावरील जीएसटी देखील शून्यावर आणण्यात आला आहे.


पंतप्रधान पत्रात पुढे म्हणतात, मला हे पाहून आनंद होत आहे की अनेक दुकानदार आणि व्यापारी 'आधी आणि आता' असे फलक लावत आहेत, जे लोकांना काही वस्तू किती स्वस्त झाल्या आहेत हे सांगत आहेत. आपला जीएसटी प्रवास २०१७ मध्ये सुरू झाला. त्यानंतर देश अनेक प्रकारच्या कर आणि टोलच्या जंजाळातून मुक्त झाला. यामुळे ग्राहकांना, व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना दिलासा मिळाला. आता या पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा आपल्याला आणखी पुढे घेऊन जात आहेत. ही व्यवस्था आणखी सोपी करण्यात आली आहे. यामुळे आमच्या दुकानदार मित्र आणि लघु उद्योगांना आणखी लाभ होईल. व्यवसाय वृद्धीला चालना मिळेल. नागरिक देवो भव हा आमचा मंत्र आहे. गेल्या ११ वर्षांत आमच्या प्रयत्नांनी २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. देशात एक नव-मध्यमवर्ग उदयास आला आहे. आता तो अधिक सक्षम होत आहे. आम्ही मध्यमवर्गालाही बळकटी दिली आहे. १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जात नाही. जर आपण आयकर सवलत आणि नवीन जीएसटी सुधारणा एकत्र केल्या तर नागरिक दरवर्षी अंदाजे २.५ लाख कोटी रुपये वाचवू शकतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रात पुढे नमूद करतात, देशाने २०४७ पर्यंत विकसित भारत साध्य करण्याचा संकल्प केला आहे आणि हे साध्य करण्यासाठी, स्वावलंबनाचा मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. नवीन जीएसटी सुधारणा आत्मनिर्भर भारत मोहिमेला देखील गती देतील. स्वावलंबनासाठी आपण स्वदेशीला आपल्या जीवनाचा एक भाग बनवणे आवश्यक आहे. ब्रँड किंवा कंपनी काहीही असो, जर त्यात भारतीय कामगार आणि कारागिरांच्या कठोर परिश्रमांचा समावेश असेल तर ती स्वदेशी आहे. जेव्हा तुम्ही आपल्या देशातील कारागीर, कामगार आणि उद्योगांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्ही अनेक कुटुंबांच्या उपजीविकेला हातभार लावता आणि आपल्या तरुणांसाठी रोजगार निर्माण करता. मी आपल्या दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना फक्त स्वदेशी वस्तू विकण्याचे आवाहन करतो. आपण अभिमानाने म्हणू की, ही स्वदेशी वस्तू आहे. आपली घरगुती बचत वाढावी, स्वप्न सत्यात उतरावी, आवडीच्या गोष्टी करुन सण साजरा करण्याचा आनंद घेण्याची संधी मिळावी, ही सदिच्छा. पुन्हा एकदा, मी तुम्हाला नवरात्रीच्या आणि 'जीएसटी बचत महोत्सवाच्या' खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद!


Comments
Add Comment

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)