पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

या दिवशी होणाऱ्या विमानतळाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात देशभरातून मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ६:१० वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

पनवेल, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना उद्घाटनाच्या दिवशी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. अवजड वाहन चालकांनी निर्धारित वेळेत प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

वाहतूक पोलिसांनी कार्यक्रमस्थळी आणि आसपासच्या परिसरात विशेष पथके तैनात केली असून, सुरक्षा व शिस्तबद्ध वाहतूक राखण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा