भारताचा इतिहास पराभवाचा नव्हे संघर्षाचा”- सरसंघचालक

नागपूर : भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील स्वस्थपणे झोपू शकला नाही. कारण भारतीयांनी प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात संघर्ष करून त्यांना सडेतोड उत्तर दिले होते असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूरच्या भोसले घराण्यावरील 4 पुस्तकांचे डॉ. भागवत यांच्या हस्ते शुक्रवारी प्रकाशन करण्यात आले. नागपूरच्या सिनिअर भोसला पॅलेस येथे आयोजित प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

यावेळी सरसंघचालक म्हणाले की, भारतात कधीही शौर्याची कमतरता कधीच नव्हती. पण, असे असूनही, देशावर सातत्याने परकीय हल्ले होतच राहिले. छत्रपती शिवराय हे या या परकीय आक्रमकांचा उपाय होते. शिवरायांनी आपल्यासोबत मित्र जोडून देव, देश आणि धर्मासाठी परकीय सत्तेशी संघर्ष केला. परिस्थिती कशीही असली तरी आपुलकीने माणसे जोडण्याची मनस्थिती आणि त्यामागची प्रेरणा जोवर होती तोवर आमचा इतिहास सरशीचा राहिला आहे. तसेच हे केवळ छत्रपती आणि त्यांनी निर्माण केलेल्या मराठा साम्राज्यापर्यंत मर्यादित राहिले नाही तर इतरही अनेक राजांनी त्यापासून प्रेरणा घेऊन संघर्षाला गती आणि बळ देण्याचे काम केले. राजस्थानमध्ये, दुर्गा प्रसाद राठोड यांनी राजपूतांना एकत्र करून संघर्ष केला. त्यानंतर मुघल पुन्हा कधीही राजपुतानात पाऊल ठेवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे कूचबिहारचा राजा चक्रधर सिंह यांच्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव होता. चक्रधर सिंहानी दुसऱ्या राजाला लिहीलेल्या पत्रात असे म्हंटले आहे की, "आता, आपणही शिवाजी महाराजांप्रमाणे परदेशी आक्रमकांना बंगालच्या समुद्रात बुडवून त्यांचा नाश करू शकतो." असे सरसंघचालकांनी सांगितले.

व्यापक राष्ट्रहितासाठी स्वार्थाचा त्याग करून देश कार्यासाठी उभे राहण्याची तयारी ठेवावी लागते.

कान्होजी आंग्रे यांनी आपल्या वतनावर पाणी सोडून आपल्या 4 मुलांसह शिवाजी राजांना येऊन मिळाला होता. त्यामागे “राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” ही प्रेरणा होती. हिच प्रेरणा नागपूरकर भोसलेंनी देखील कायम ठेवली होती. अप्पासाहेब भोसलेंनी काबुल-कंधार पर्यंत संधानस साधून इंग्रजांच्या विरोधात दिलेला लढा हे त्याचेच द्योतक होते. नागपूरच्या भोसले राजघराण्याचा हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याची गरज असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्रनाथ महाराज, पुस्तकांच्या लेखकांची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा