परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. दिवसभर ऊन आणि सायंकाळी वादळी पावसाच्या सरींमुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान झाले. कापलेले भातपीक शेतातच भिजल्याने त्याला कोंब फुटले असून पेंढा कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरांसाठी चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

अलिबाग तालुक्यातील खारेपाठ विभाग, रेवस, हाशिवरे, माणकुळे, शिरवली, नारंगी, फोफेरी, पेढांबे, वाघ्रण, सातघर, लोणघर, कोपर, चरी, शहापूर, शहाबाज आणि पोयनाड परिसरात शेतकऱ्यांच्या भातशेतीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. चिखलात अडकलेले आणि पडलेले पीक कुजल्याने शेतकरी निराश आणि हताश झाला आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हा प्रमुख कृष्णकांत पाटील यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. “फक्त घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी अलिबाग प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना या संदर्भात लेखी निवेदन देण्याचे सांगितले.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून, रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरसकट पंचनामे करून विशेष हेक्टरी मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक एका झटक्यात पाण्यात गेली असून, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी चालू पीककर्ज माफ करून नवी मदत योजना तातडीने राबवावी.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा