महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही नऊ सदस्यीय समिती पुढील 6 महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

शेतकऱ्यांसाठी गठित ही उच्चस्तरीय समिती अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजनांसंदर्भात शिफारसी तयार करेल. महसूल, वित्त, कृषी, सहकार आणि पणन या विभागांचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी या समितीत समाविष्ट आहेत.राज्य सरकारच्या या निर्णयाला प्रहार जनशक्ती संघटनेच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतरच सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

शासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कणा आहेत. परंतु अनियमित पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी व पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. परिणामी, अनेक शेतकरी कर्जफेड करण्यात अपयशी ठरतात आणि नव्या पिक कर्जासाठी त्यांना बँकांकडून मदत मिळणे कठीण होते.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४