Local body Elections : भाजपची ऐतिहासिक मुसंडी; मतदानाआधीच तब्बल ७५ टक्के जागा बिनविरोध!

'गेम' झाल्याचा काँग्रेसचा आरोप, काँग्रेसने घेतली थेट हायकोर्टात धाव!


मुंबई : संपूर्ण देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असताना, केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव मध्ये एक धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. या प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, मतदानाआधीच तब्बल ७५ टक्के जागा बिनविरोध झाल्या असून, यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत.


बुधवारी या केंद्र शासित प्रदेशात स्थानिक निवडणुकांसाठी मतदान पार पडले. मात्र, त्यापूर्वीच ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या प्रमुख पदांच्या निवडणुकीत भाजपचे एकूण १२२ पैकी ९१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणुकीपूर्वीच ७५ टक्के जागा भाजपच्या पदरात पडल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.



काँग्रेसचे अर्ज बाद, 'षडयंत्रा'चा आरोप


या मोठ्या राजकीय खेळीमागे 'गेम' झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचा दावा आहे की, त्यांच्या ८० टक्के उमेदवारांचे अर्ज निवडणुकीच्या रिंगणातून बाद करण्यात आले. याविरोधात काँग्रेसने थेट मुंबई हायकोर्टात धाव घेऊन बाद करण्यात आलेल्या अर्जांना आव्हान दिले आहे.


काँग्रेसचे प्रदेश प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी हे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप केला. त्यांनी तक्रार केली की, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त सात दिवसांचा कालावधी दिला गेला. सुरुवातीचे दोन दिवस अर्ज उपलब्ध नव्हते आणि आवश्यक कागदपत्रांची यादीही वेळेवर मिळाली नाही. अर्ज छाननीचे ठिकाण अचानक बदलले गेले, आणि अर्ज भरण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, भाजपच्या एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झाला नाही, यावर त्यांनी जोर दिला.


दरम्यान, भाजपच्या विजयी उमेदवारांना २४ आणि २५ ऑक्टोबर रोजीच विजयी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

भाजपची ५ वर्षांत मोठी झेप


बिनविरोध झालेल्या जागांची आकडेवारी भाजपच्या विजयाची कहाणी सांगते.


जिल्हा पंचायती: ४८ पैकी ३५ ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले (मागील वेळी भाजपला फक्त ९ ठिकाणी विजय मिळाला होता).


सरपंच पदे: ४४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी तब्बल ३० सरपंच भाजपचे बिनविरोध निवडून आले.


दमन: जिल्हा पंचायतीत १६ पैकी १०, पालिकेत १५ पैकी १२ आणि १६ ग्रामपंचायतींपैकी १० मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.


दीव: आठ जिल्हा पंचायतींपैकी पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले.


दादरा व नगर हवेली: जिल्हा पंचायतीत २६ पैकी २०, १५ नगरपालिका वॉर्डपैकी १४ आणि २६ ग्रामपंचायतींपैकी १८ ठिकाणी भाजपला यश मिळाले.


Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा