Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत मुदतवाढ दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती, ती आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रियेत ओटीपी (OTP) प्राप्त होणे अशक्य होणे किंवा इतर तांत्रिक समस्या उपस्थित केल्या होत्या.


या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्देशानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत, त्यांना या विस्तारित कालावधीत काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत त्यांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. मंत्री आदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी लाभार्थी महिलांना आवाहन केले आहे की, या विस्तारित कालावधीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.



ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?



  • लाभार्थींनी त्यांच्या मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.

  • पोर्टलवर लॉगिन केल्यावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि Captcha Code योग्य ठिकाणी टाका.

  • आधार प्रमाणिकरणासाठी परवानगी देऊन 'Send OTP' या पर्यायावर क्लिक करा.

  • आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाईप करा.

  • यानंतर, पती/वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नमूद करून त्यांची OTP प्रक्रिया पूर्ण करा.

  • लाभार्थी भगिनीचा जात प्रवर्ग निवडा.

  • आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करून संपूर्ण माहितीची एकदा पडताळणी करावी आणि 'Submit' बटण क्लिक करावे.

  • 'e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली' असा संदेश स्क्रीनवर दिसल्यास प्रक्रिया पूर्ण झाली समजावी.



ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे



  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि फोटो.

  • रेशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती.

  • डोमासाईल किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.

  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास, पतीचे वरीलपैकी कोणतेही (१५ वर्षांपूर्वीचे) अधिवास सिद्ध करणारे कागदपत्र लागेल.

  • वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल.

  • बँक खाते तपशील (Bank Account Details) आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा