कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बांधकाम व्यवसाय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्यांना धमकावणे, त्यांच्याकडे खंडणी मागणे अथवा त्यांचे अपहरण करुन सुटकेच्या बदल्यात पैसे मागणे हे प्रकार वाढू लागले आहेत. ताजी घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहे. मुंबईच्या कांदिवलीत चारकोप परिसरात भरदिवसा फ्रेंडी दिलीमा भाई नावाच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. अज्ञाताने फ्रेंडी दिलीमा भाईवर तीन राऊंड फायर केले. गोळीबारात फ्रेंडी दिलीमा भाई गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शेतात पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींना अटक केली.


कांदिवलीच्या चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार झाला. दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या. जखमी झालेल्या फ्रेंडी दिलीमा भाईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार करुन फरार झालेल्यांना अवघ्या काही दिवसांत शोधून काढले. गोळीबाराची घटना १९ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली आणि पोलिसांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतात पाठलाग करुन चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केली आहेत.


मुंबईतील कांदिवलीत राहणारा राजेश रमेश चौहान उर्फ दया (४२), पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये राहणारा सुभाष भिकाजी मोहिते (४४), पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राहणारा मंगेश एकनाथ चौधरी (४०) आणि ठाणे जिल्ह्यातील काशीगावमध्ये राहणारा कृष्णा उर्फ रोशन बसंतकुमार सिंह (२५) या चौघांना पोलिसांनी कांदिवलीच्या चारकोप परिसरात फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार ! सिंहस्थ कुंभमेळ्यावर तब्बल ३५ हजार कोटींचा खर्च

Nashik Kumbhmela : हिंदू धर्मीयांच्या आस्थेशी जोडलेल्या कुंभमेळ्याने गतवर्षी प्रयागराजमध्ये गर्दीचे नवे विक्रम

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Thane Crime : ठाणे ग्रामीण भागात शाळेतील कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; २२ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर अटक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यावर २२ अल्पवयीन विद्यार्थिनींनी

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे