वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची पवित्र प्रतिज्ञा होती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी लोकसभेत विशेष चर्चेच्या उद्घाटनावेळी बोलत होते.


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, वंदे मातरम् या राष्ट्रगीताचा १५० वर्षांचा प्रवास संघर्ष, प्रेरणा आणि अनेक ऐतिहासिक टप्पे यांनी भरलेला आहे. जेव्हा वंदे मातरमला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये अडकला होता आणि जेव्हा १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश आणीबाणीच्या साखळदंडांनी बांधला गेला होता. त्या काळात संविधानाचा गळा दाबण्यात आला आणि देशभक्तांना तुरुंगात टाकण्यात आले. पंतप्रधान म्हणाले की, वंदे मातरम् हा स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण देशाला एकता, शौर्य आणि बलिदानाची ताकद देणारा मंत्र आहे.


१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, जेव्हा ब्रिटिश राजवटीत जुलूम आणि अत्याचार वाढत होते, तेव्हा बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ब्रिटिश राजवटीच्या "गॉड सेव द क्वीन" या मोहिमेला वंदे मातरम् च्या माध्यमातून जोरदार प्रतिसाद दिला. ब्रिटिश इतके घाबरले होते की त्यांना या गाण्यावर बंदी घालणारे आणि त्याचे प्रकाशन रोखणारे कायदे करावे लागले.


१८५७ नंतर भारतावर नियंत्रण ठेवणे सोपे होणार नाही हे ब्रिटिशांना समजले होते, म्हणून त्यांनी बंगालला केंद्रस्थानी ठेवून "फोडा आणि राज्य करा" या धोरणाचा अवलंब केला. अशा वेळी, बंगालची बौद्धिक शक्ती आणि वंदे मातरमच्या उदयाने संपूर्ण देशात नवीन ऊर्जा आणली. ते म्हणाले की आज देश वंदे मातरमची १५० वर्षे, सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आणि गुरू तेग बहादूर यांचा ३५० वा शहीद दिन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार आहे.


हा काळ भारतीय इतिहासातील प्रेरणादायी घटनांची पुनरावृत्ती करण्याची संधी प्रदान करतो. मोदी म्हणाले की, वंदे मातरमने १९४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या चळवळीला दिशा दिली. आज, जेव्हा सभागृह या चर्चेत गुंतलेले आहे, तेव्हा ते पक्ष किंवा विरोधाबद्दल नाही, तर लोकशाहीच्या या उच्च संस्थेत आपल्याला बसवण्याचे ऋण मान्य करण्याची संधी आहे. ते म्हणाले की, वंदे मातरमची १५० वर्षे ही देश आणि संसद दोघांचाही अभिमान पुनर्संचयित करण्याची एक महत्त्वाची संधी आहे.


पं. नेहरू ‘मुस्लीम लीग’ला शरण गेले

१९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम लीगने (स्वातंत्र्यापूर्वी) वंदे मातरमविरुद्ध मोहीम राबवली; परंतु काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमची चौकशी सुरू केली. ते मुस्लीम लीगसमोर शरण गेले. नेहरूंनी दावा केला की, वंदे मातरम मुस्लिमांच्या भावना भडकावू शकते. आपल्या पुढच्या पिढ्यांना हे कोणी केले हे सांगणे आपले कर्तव्य आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंवर हल्लाबोल केला. "जीनांनी वंदे मातरमला विरोध केल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना एक पत्र लिहिले होते, यामध्ये त्यांनी म्हटले होते की, मी वंदे मातरमची पार्श्वभूमी वाचली आहे. ते वंदे मातरम मुस्लिमांच्या भावना भडकावू शकते. ते वंदे मातरमचा वापर तपासतील."

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा