मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ओटीपीद्वारे पडताळणीची नवी प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. या निर्णयानुसार १९ डिसेंबरपासून पुण्याशी संबंधित मध्य रेल्वेच्या आणखी पाच गाड्यांवर ही व्यवस्था अंमलात येणार आहे.


नव्या पद्धतीनुसार पुणे–अमरावती एक्सप्रेस, पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, सीएसएमटी–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, एलटीटी–गोंडा गोदान एक्सप्रेस आणि एलटीटी–जयनगर एक्सप्रेस या गाड्यांवर तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी पडताळणी बंधनकारक राहणार आहे.


या बदलानंतर आरक्षण काउंटर, अधिकृत एजंट तसेच IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून केलेल्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना ओटीपी देणे आवश्यक असेल. बुकिंगवेळी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल आणि तो टाकल्यानंतरच तिकीट निश्चित होणार आहे.


ओटीपी पडताळणीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रवाशांनी तिकीट बुकिंग करताना स्वतःचा चालू आणि अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढेल आणि गैरवापराला आळा बसण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा