Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी घोषणांची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या नव्या वचननाम्यावर टीका करताना उदय सामंत यांनी 'जुन्या आश्वासनांचे काय झाले?' असा परखड सवाल उपस्थित करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे.



मुंबईकरांची २५ वर्षे वाया गेली?


गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे. तरीही मुंबईकरांना हक्काची घरे आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. "आता दोन्ही ठाकरे एकत्र आले असून त्यांनी नवीन वचननामा जाहीर केला आहे, मात्र हादेखील केवळ कागदावरच राहील," असा अविश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा कायापालट करायचा असेल, तर महायुतीचा महापौर बसवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


"महापौर मराठीच होणार" 


मराठी माणसाला मुंबईत पुन्हा सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या "मुंबईचा महापौर मराठीच होईल" या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. राज ठाकरे यांनीही मराठी महापौराची मागणी केल्यास त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र ही जबाबदारी केवळ महायुतीचे नगरसेवक आणि महापौरच समर्थपणे पेलू शकतात, असे मत त्यांनी मांडले.


राज ठाकरेंच्या 'खंजीर' प्रकरणावर भाष्य


यावेळी उदय सामंत यांनी जुन्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "आम्ही पूर्वीच भविष्यवाणी केली होती की उद्धव ठाकरे हे मनसेला केवळ ५०-५५ जागा देऊन राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि प्रत्यक्षात तसेच घडले," असे ते म्हणाले. या दगाफटक्यामुळे राज ठाकरेंच्या मनात आजही वेदना असतील, पण त्या ते उघडपणे बोलू शकत नाहीत, असे सूचक विधानही त्यांनी केले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा