Himachal Bus Accident : हिमाचलमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बस ६० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

नाहन : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक खासगी बस रस्ता सोडून सुमारे ६० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?



 

मिळालेल्या माहितीनुसार, 'जीत कोच' नावाची ही खासगी बस शिमला येथून कुपवीकडे जात होती. सिरमौर जिल्ह्यातील रेणुकाजी विधानसभा क्षेत्रातील हरिपुरधारजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावरून खाली घसरली आणि खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी प्रवाशांचा मोठा आक्रोश ऐकायला मिळत होता. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, जखमींना हरिपुरधार येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. या रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा नसल्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. सुक्खू सरकारने या रुग्णालयाचा दर्जा कमी (डिनोटिफाई) केल्यामुळे उपचारात अडथळे येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेणुकाजीचे आमदार विनय कुमार आणि एसपी निश्चित सिंह नेगी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्रींनी व्यक्त केला शोक


स्थानिकांचे धाडसी बचावकार्य अपघात होताच हरिपुरधार बाजारपेठेतील स्थानिक नागरिकांनी तातडीने दरीच्या दिशेने धाव घेतली. बस पूर्णपणे चक्काचूर झाल्यामुळे जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने हरिपुरधार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवासी संख्या जास्त असल्याने जखमींचा आकडा मोठा असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "सोलनहून हरिपुरधारला जाणाऱ्या खासगी बसचा झालेला हा अपघात अत्यंत वेदनादायक आहे. या भीषण दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना." या अपघातामुळे संपूर्ण सिरमौर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा