मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानानंतर केलेल्या एका वक्तव्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी पुण्याच्या सध्याच्या विकास प्रक्रियेबाबत आपली भूमिका मांडली.


पुण्याचा विस्तार वेगाने होत असला, तरी हा बदल नागरिकांसाठी अत्यंत गरजेचा आहे का?, असा प्रश्न भावे यांनी उपस्थित केला. विकास म्हणजे केवळ उंच इमारती उभ्या राहणे नव्हे, तर त्यासोबत मोकळ्या जागा, मैदाने आणि सार्वजनिक सुविधा असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. काही भागांमध्ये कमी उंचीच्या इमारतींच्या जागी मोठमोठ्या संकुलांचे बांधकाम होत असल्याने शहरावर ताण वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांच्या भूमिकेवरही भर दिला. केवळ मतदान करून थांबणे पुरेसे नसून, निवडून आलेल्या प्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष ठेवणे ही नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. नागरिक एकत्र येऊन आपली मतं ठामपणे मांडतील, तरच विकासाची दिशा बदलू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


शहर नियोजनाबाबत बोलताना भावे यांनी मोकळ्या जागांचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांसाठी खेळाची ठिकाणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या जागा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे सांगत, विकासाचे निकष पुन्हा एकदा तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, त्यांच्या या मतप्रदर्शनामुळे पुणेकरांमध्ये चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर समोर अलेलले हे वक्तव्य पुणेकरांना
भविष्यासंदर्भात विचार करायला लावणारे आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा