भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या अहवालानुसार भारतीय पासपोर्टच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून भारत आता ८० व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पायऱ्यांची मोठी झेप घेतली असून आता भारतीय नागरिकांना जगातील ५५ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधेद्वारे प्रवास करता येणार आहे. भारताची ही प्रगती देशाच्या मजबूत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतीक मानली जात आहे.


या जागतिक क्रमवारीत सिंगापूर १९२ देशांच्या सुविधेसह पहिल्या स्थानावर आहे, तर जपान आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानी आहेत. भारताने आपल्या शेजारील देशांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली असून पाकिस्तान ९८ व्या तर बांगलादेश ९५ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भारतीय पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले थायलंड, मलेशिया आणि मॉरिशस यांसारख्या देशांनी भारतीय पर्यटकांना व्हिसाच्या कटकटीतून मुक्त केले आहे. यामुळे आता कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय केवळ पासपोर्ट घेऊन या देशांची सफर करणे शक्य होणार आहे.


या वाढीव सुविधेचा फायदा आशिया, आफ्रिका, ओशनिया, कॅरिबियन आणि मध्य पूर्वेतील अनेक भागांमधील भारतीय प्रवाशांना होईल. लोकप्रिय व्हिसा-मुक्त देशांमध्ये थायलंड, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, बार्बाडोस, फिजी, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि इतर समावेश आहे. व्हिसा-ऑन-अरायव्हल देशांमध्ये इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, केनिया, जॉर्डन आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे. या सुविधेमुळे आता फॅमिली ट्रिप, हनिमून किंवा सुट्ट्यांच्या सहलींचे नियोजन करणे भारतीयांसाठी अधिक सुलभ होईल. प्रत्येक देशामध्ये राहण्याचा कालावधी हा १५ दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत वेगवेगळा असू शकतो. ही आनंदाची बातमी असली तरी पर्यटकांनी एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे की हे नियम आंतरराष्ट्रीय धोरणांनुसार बदलू शकतात, त्यामुळे प्रवासापूर्वी संबंधित देशाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासून घेणे सोयीचे ठरेल. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांसाठी अद्याप व्हिसाची गरज असली तरी ५५ देशांनी दिलेली ही सूट भारतीय पर्यटकांच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा पुरावा आहे.


जेव्हा आपण परदेश प्रवासाचा विचार करतो, तेव्हा व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया सर्वात कठीण असते. मात्र आता अंगोला, बार्बाडोस, भूतान, फिजी, जमैका, कझाकिस्तान, नेपाळ आणि सेनेगल यांसारख्या देशांमध्ये भारतीय पर्यटकांना थेट प्रवेश मिळणार आहे. याशिवाय इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, कंबोडिया, कतार आणि सेशेल्स यांसारख्या देशांमध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावरच व्हिसा मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. केनिया आणि म्यानमार सारख्या देशांनी इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन म्हणजेच ई-व्हिसाची सुविधा दिली आहे, ज्यामुळे घरबसल्या ऑनलाइन परवानगी मिळवणे सोपे झाले आहे.


Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा