नॅशनल पार्क बंद : आदिवासींच्या घरावर बुलडोझर, आंदोलकांनी केली दगडफेक

बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आदिवासींच्या बेकायदा घरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईचा विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाने मोठी गर्दी करत पोलिसांवर दगडफेक केली. या सगळ्या गोंधळामुळे आज म्हणजेच मंगळवार २७ जानेवारी रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उद्यानाच्या मुख्य दारावर बॅरिगेटिंग केले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.


जनतेच्या निषेधानंतर, पोलिस पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिस कारवाईचा निषेध करण्यात महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने असल्याचे समोर आले आहेत. जनतेच्या तीव्र निषेधाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा पोलिस पथक मागे हटू लागले तेव्हा काही लोक दगड उचलताना दिसले. घटनेदरम्यान दगडफेकही झाली. परिणामी, बेकायदेशीर कब्जा हटवता आला नाही.






नेमकं प्रकरण काय ?

१९९५ च्या आधीपासून राहणाऱ्या आदिवासींना संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये राहण्यास परवानगी आहे. त्यानंतर राहायला आलेल्या आदिवासींना घरे देऊन त्यांना पुनर्विकासाचा लाभ मिळाल्याचे प्राशाशणाचे म्हणणे आहे. मात्र, असं असूनही पुन्हा एकदा काही जणांकडून अतिक्रमण करण्यात आले आणि त्यावर कारवाई करण्यात आल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


या सर्व प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की; "बोरिवलीत काही घटकांना घरं दिलीत, काहींना राहिली आहेत. यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, त्यासाठी बैठक आहे, मला दगडफेकीसंदर्भात माहिती नाही त्यासंदर्भात मी माहिती घेतो. नॅशनल पार्क हा अतिशय सेन्सेटिव्ह विषय आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झोपडपट्टी काढण्याचे हे आदेश देण्यात आले आहेत."

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४