रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई


अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी रंगतदार लढाई होत असून, २०१७ साली झालेली निवडणूक लढवून विजयी झालेले १४ सदस्य यंदा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागच्यावेळी पती निवडून आलेल्या तीन जागांवर पत्नी निवडणूक लढत असून, पत्नी निवडून आलेल्या सहा जागांवर यंदा पती निवडणूक लढवत आहेत.


रायगड जिल्हा परिषदेच्या २०१७ साली विजयी झालेल्या सात सदस्यांनी यंदा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे उर्वरित माजी सदस्यांना मतदार पुन्हा संधी देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मतदान व मतमोजणी तारीख बदलेली असून, मतदान व मतमोजणी दोन दिवस पुढे गेली आहे. ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दोन दिवस उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचे मिळाले आहेत. जिल्ह्यात सोयीनुसार युती, आघाडी करण्यात आलेली असून, रायगड जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याने जिल्हा परिषदेवर कोण आपले वर्चस्व प्रस्तापित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


रायगड जिल्हा परिषद २०१७ च्या निवडणुकीत शेकापचे २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी ३ असे ५९ सदस्य निवडून गेले होते. मात्र नऊ वर्षांत राजकीय परिस्थिती बदललेली आहे. ‘शेकाप’चे आलेले २३ सदस्य हे सध्या इतर पक्षात गेल्याने शेकापला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागली आहे. या नवतरुण उमेदवारांना मतदार स्वीकारतात का हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मागच्यावेळी निवडून आलेले सुधाकर घारे, मोतीराम ठोंबरे, नरेश पाटील, रवींद्र देशमुख, सुरेश खैरे, आस्वाद पाटील, बबन मनवे हे यंदाच्या निवडणुकीपासून लांब राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मागच्यावेळी निवडून आलेले १४ जण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. त्यामुळे मतदार त्यांना पुन्हा संधी देणार का, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.


मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल


शेकाप - २३


शिवसेना – १८


राष्ट्रवादी काँग्रेस – १२


भाजप - ३


काँग्रेस - ३


माजी सदस्य पुन्हा आजमावणार नशीब
नारायण डामसे, नीलिमा पाटील, प्रभाकर म्हात्रे, रिना घरत, सुश्रूता पाटील, चित्रा पाटील, दिलीप भोईर, मानसी दळवी, सुरेंद्र म्हात्रे, राजश्री मिसाळ, किशोर जैन, गीता जाधव, स्वाती नवगणे, चंद्रकांत कळंबे हे पुन्हा नशीब आजमावत आहेत.

Comments
Add Comment

Raigad : शारलोट लेक रिकामा, पर्यटनाचा हंगाम कोरडा; माथेरानकरांचा व्यवसाय ठप्प?

रायगड : पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलणाऱ्या माथेरानच्या पर्यटनाला यंदा शारलोट लेक रिकामा केल्याचा मोठा

Mumbai Goa Highway : कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात वाहनांवर पाण्याची गळती सुरूच

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भुयारी मार्गामध्ये

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर