जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान करा, मंत्री नितेश राणेंचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.


'मतदान करा, लोकशाही मजबूत करा...
राज्यात आज सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन-२०२६ च्या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि आपल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच मतदान करने अत्यंत आवश्यक आहे...
आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार रोजी जि.प. व पंचायत समिती साठी सर्वत्र मतदान होत आहे, प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावला पाहिजे...
मतदान करा व आपली लोकशाही मजबूत करा...
मतदानाची वेळ :-
सकाळी ०७:३० ते सायं ०५:३० वाजेपर्यंत...'


अशी पोस्ट करून मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.


राज्यातील जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान सुरू आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र