India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये समावेशक आणि ‘सॉव्हरिन एआय’ याविषयावर ते बोलत होते.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जगातील १०० हून अधिक देशांतील प्रतिनिधी या ऐतिहासिक परिषदेत सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून, तंत्रज्ञान कौशल्याचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान म्हणाले की, भारत केवळ नवीन तंत्रज्ञान निर्माण करत नाही, तर ते वेगाने आत्मसातही करतो. देशात तंत्रज्ञान सक्षम करणारी भक्कम परिसंस्था (इकोसिस्टम) निर्माण झाली आहे. काही लोकांना नव्या तंत्रज्ञानाबाबत शंका वाटत असली, तरी भारतीय युवक ज्या वेगाने एआय स्वीकारत आहेत, तो अभूतपूर्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समिटमधील एआय प्रदर्शनाबाबतही मोठा उत्साह दिसून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न:


इतिहासातील निर्णायक टप्प्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काही बदलांनी संपूर्ण शतकांची दिशा बदलली आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा तसाच एक परिवर्तनबिंदू आहे. एआय केवळ यंत्रांना बुद्धिमान बनवत नाही, तर मानवी क्षमताही अनेक पटींनी वाढवत आहे. भविष्यात एआय काय करू शकते हा खरा प्रश्न नाही; आज आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न असल्याचे मोदी म्हणाले.



जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक:


मशीन लर्निंगपासून लर्निंग मशीनपर्यंतचा प्रवास वेगवान, सखोल आणि व्यापक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे मोठा दृष्टीकोन ठेवत जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.यासोबतच, पुढील पिढ्यांच्या हाती आपण एआयचे कोणते स्वरूप देणार आहोत, याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा