Pune: पुण्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं पितळ उघड

पुणे: पुण्याच्या गजबजलेल्या बुधवार पेठेत गेल्या २० वर्षांपासून बाबू भैय्या हे नाव अत्यंत दबदब्यानं घेतलं जातं. हॉटेलमध्ये छोटी-मोठी कामं करणाऱ्या एका साध्या कामगारापासून ते या पेठेतील अनैतिक व्यापाराचा किंगपिन होण्यापर्यंतच्या प्रवासाचं पितळ उघड पडलं आहे. तब्बल दोन दशकांपासून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून बांगलादेश ते पुणे अशी तस्करीची साखळी चालवणाऱ्या बाबू भैय्याचं गुपित आता उघड झालं आहे. तसेच पुणे पोलिसांनी या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे.



मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश



पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी अलीकडेच एक धाडसी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २२ महिलांना ताब्यात घेतले, ज्याची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. यातील ११ महिला या मूळच्या बांगलादेशी नागरिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.


विशेष म्हणजे यापूर्वी टाकलेल्या दोन छाप्यांमध्येही १० बांगलादेशी नागरिक आढळले होते. या महिलांकडे भारतीय बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर ओळखपत्रे सापडली आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी मानव तस्करी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड बाबू भैय्या उर्फ पापा शेख असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


बाबू भैय्या उर्फ पापा शेख हा गेल्या २० वर्षांपासून पुणे शहरात सक्रिय आहे. सुरुवातीच्या काळात तो एका हॉटेलमध्ये किरकोळ कामे करायचा, पण तिथूनच त्याने वेश्याव्यवसायातील बारकावे शिकून घेतले. कोलकात्यामार्गे बांगलादेशी महिलांना पुण्यात आणण्याचे तंत्र त्याने अवगत केले आणि हळूहळू आपले साम्राज्य विस्तारले.


पापा शेखने तीन लग्ने केली असून त्याची एक पत्नी बांगलादेशी आहे. या तिन्ही पत्नी बुधवार पेठेत आपला दरारा राखून आहेत आणि पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतात. जर एखाद्या महिलेने या दलदलीतून बाहेर पडण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर तिला बेदम मारहाण केली जात असे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.


हे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते. आरोपी महिलांना ब्युटी पार्लरमध्ये नोकरी किंवा शिलाई कामाचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारतात आणत असतं. पुण्यात आणल्यानंतर त्यांना पैशांचे आमिष दाखवून किंवा धाक दडपशाही करून वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. या महिलांच्या कमाईतील मोठा हिस्सा हा पापा शेख आणि त्याची टोळी स्वतःकडे ठेवत असे.


या प्रकरणी पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या मुख्य सूत्रधार पापा शेख फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. फरासखाना आणि खडक पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई यशस्वी केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ११ बांगलादेशी महिलांना पुन्हा त्यांच्या देशात म्हणजेच बांगलादेशात पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या रॅकेटमध्ये बांगलादेश सीमेवर बसून बोगस कागदपत्रे तयार करून देणारे दलाल कोण आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. गेल्या काही वर्षांत बुधवार पेठेत अशा प्रकारच्या कारवाया वाढल्या असून, मानवी तस्करीचे हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तोडण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा