Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' दिला आहे. दुसऱ्या बाजूला कृषी विभागाकडून मार्च महिन्यातील नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे.


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत हवामान बिघडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.


मार्चमध्ये झालेले नुकसान



राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सुमारे ६२ हजार ९६९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका यासह द्राक्ष, आंबा आणि केळी या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


एप्रिल महिन्यात सुद्धा अवकाळी पाऊस सुरु राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची भीती आहे.


हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर उभे राहू नका. वीज उपकरणांचा वापर टाळावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा. वादळी वारे वाहत असल्यास कच्च्या बांधकामांपासून दूर राहा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा