Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून देशातील लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिलांशी विज्ञान भवन येथे संवाद साधणार आहेत. भारताला २०४७ पर्यंत विकसित करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वात करायच्या कामांविषयी चर्चा करणार आहेत. देशाच्या विकास कार्यक्रमात महिलांचा अधिकाधिक सहभाग असावा याच विचारातून पंतप्रधान मोदी लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार आहेत. नारी शक्ती वंदन संमेलनात प्रशासन, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योजकता, प्रसारमाध्यमे, समाजसेवा, संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिला सहभागी होणार आहेत.


देशाच्या संसदेने सप्टेंबर २०२३ मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक मंजूर केले. हे करताना महिलांचे आरक्षण नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडले होते. कोरोना संकटामुळे जनगणनेला विलंब झाल्याने २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात महिला आरक्षण लागू करण्यासाठी गुरुवार ते शनिवार, १६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात नवे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नारी शक्ती वंदन संमेलन होणार आहे.


भारताच्या विकास कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तसेच या कार्यक्रमातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ग्रामीण प्रशासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंचायतींपासून ते देशाच्या संसदेपर्यंत सर्व पातळ्यांवर प्रशासन आणि नेतृत्वामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे आवश्यक आहे, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. सरकारची ही भूमिका आणि त्यामागील कारणं समजावून सांगण्यासाठी नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)