Nari Shakti Vandan : महिला आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन एकमत’

सर्वपक्षीय खासदारांना धाडले पत्र; ‘नारी शक्ती वंदन कायद्या’च्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन


मुंबई : महिला आरक्षण विधेयकाच्या एकमताने मंजुरीसाठी केंद्र सरकारने कंबर कसली असतानाच, महाराष्ट्रातही या विषयावर राजकीय सहमती घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. संसदेच्या १६ ते १८ एप्रिल दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांसह विविध राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून या ऐतिहासिक विधेयकाला एकमताने पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्रांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. "महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी हे पाऊल उचलले जात असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे आणि विधेयकाला एकमताने पाठिंबा द्यावा," असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.


लोकसभेत दिसणार २८० महिला खासदार : केंद्र सरकारने 'नारी शक्ती वंदन विधेयक' सप्टेंबर २०२३ मध्येच मंजूर केले होते, मात्र त्याची अंमलबजावणी जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेवर अवलंबून होती. आता सरकारने या प्रक्रियेला गती देण्यासाठी सुधारित विधेयक आणले असून, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन विधेयकातील तरतुदीनुसार, लोकसभेच्या एकूण जागांची संख्या सध्याच्या ५४३ वरून वाढवून ८५० केली जाणार आहे. ८५० पैकी ८१५ जागा राज्यांसाठी, तर ३५ जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी राखीव असतील. या ८५० जागांपैकी सुमारे २७३ ते २८० जागा महिलांसाठी आरक्षित राहतील.
Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र