Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना घडल्या आणि पवार कुटुंब राजकारणामुळे विभक्त होण्याच्या चर्चा रंगू लागल्या, पण त्या चर्चांना पूर्णविराम देत आज शरद पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे.



पवार कुटुंबाच्या भेटीचे कारण काय ?


या भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी कुटुंबातील सर्व सदस्य या स्नेहभोजनसाठी हजर राहणार आहेत. शरद पवार सध्या पुण्यातील मोदीबागमध्ये वास्तव्यास आहेत. या ठिकाणी पवार कुटुंब एकत्र भेटणार आहेत. कौटुंबिक आणि राजकारणातील अनेक घडामोडी सध्या पवार कुटुंबात घडत आहेत. रेवती सुळेचं लग्न शिवाय रोहित पवार, जय पवार यांची आगामी निवडणुकांविषयी वक्तव्य या पार्श्वभूमीवर हे स्नेहभोजन होत आहे.




सुनेत्रा पवार आणि जय, पार्थ पवार राहणार उपस्थित ?


'पवार विरुद्ध पवार' अशा संघर्षांला तोंड फुटत असताना पवार कुटुंबीयांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. सायंकाळी ५ वाजता मोदीबागेत पवार कुटुंब हजर राहणार असून, सुनेत्रा पवार सध्या मुंबईत आहेत, सुनेत्रा पवार जाणार की नाही?याकडे सर्वांच्या नजरा आहेत. जय पवार बाहेर असल्याने या कार्यक्रमाला अनुउपस्थित राहू शकतात अशा चर्चा आहेत.




कौटुंबिक की राजकीय भेट ?


मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी बोलावलेली ही भेट कौटुंबिक असून कोणताही राजकीय चर्चा होणार नसल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या या स्नेहभोजनाला कोण उपस्थित राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा