Jalgaon : जळगाव–दिल्ली विमानसेवा तात्पुरती स्थगित; बहुप्रतिक्षीत विमानसेवा कधी सुरु होणार ?

जळगाव : अलायन्स एयर (Alliance Air) या विमान कंपनीतर्फे २ मेपासून सुरु होणारी बहुप्रतिक्षीत जळगाव–दिल्ली (इंदूरमार्गे) ही विमानसेवा (Jalgaon-Delhi flight) तांत्रिक अडचणींमुळे पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन मेपासून या सेवेला प्रारंभ होणार असल्याची अधिकृत घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, नियोजित उड्डाणापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणी उड्डाणात विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने कंपनीने सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. किमान तीन आठवड्यांनंतरच ती सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Jalgaon-Delhi flight service temporarily suspended)


उद्घाटनाआधीच अडथळा


दरम्यान, गेल्या आठवड्यात कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या मार्गासाठी तिकीट बुकिंगची प्रक्रिया देखील सुरु करण्यात अली होती. त्यानुसार, अनेक प्रवाशांनी २ मे रोजीच्या उद्घाटन उड्डाणासाठी आगाऊ नोंदणी केली होती. मात्र, अचानक सेवा पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रवाशांना धक्का बसला आहे. कंपनीने सर्व प्रवाशांना ई-मेलद्वारे उड्डाण रद्द झाल्याची माहिती दिल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या बुकिंग संदर्भात पुढील पर्याय देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. (Jalgaon-Delhi flight service temporarily suspended)


या विमानसेवेअंतर्गत जळगाव-इंदूर-दिल्ली (Jalgaon-Delhi flight) असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार होती. नियोजित वेळापत्रकानुसार दिल्लीहून दुपारी ४.५० वाजता उड्डाण करणारे विमान इंदूर येथे सुमारे २५ मिनिटे थांबून रात्री ७.५५ वाजता जळगाव येथे दाखल होणार होते. त्यानंतर जळगावहून रात्री ८.२० वाजता उड्डाण घेऊन तेच विमान इंदूरमार्गे दिल्लीला रात्री ११.२० वाजता पोहोचणार होते. या सेवेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट राजधानीशी हवाई जोडणी मिळणार असल्याने व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी तसेच शासकीय कामकाजासाठी प्रवास करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. (Jalgaon-Delhi flight service temporarily suspended)


सध्या कंपनीने या मार्गासाठी पुढील तीन आठवड्यांपर्यंत सर्व बुकिंग तात्पुरते बंद केले आहे. विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर किमान एक आठवडा आधी तिकीट बुकिंग पुन्हा सुरू करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एअरक्राफ्टची अभियांत्रिकी विभागाकडून सखोल तपासणी करण्यात येत असून, इंजिनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा