Extremely Severe Alert : मोबाईलवर ‘Extremely Severe Alert’! भारत सरकारची नवी आपत्ती सूचना प्रणाली चाचणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : तुमचा फोन अचानक वाजला आहे का? तर घाबरू नका. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संयुक्तपणे 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम'ची देशव्यापी चाचणी घेत आहेत.


देशभरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानक “Extremely Severe Alert” असा इशारा झळकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा कोणताही खरा धोका नसून, Government of India कडून राबवण्यात येणाऱ्या नव्या आपत्ती सूचना प्रणालीची ही चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


या अलर्टमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने Cell Broadcast System सुरू केल्याची माहिती देण्यात आली. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ सूचना देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या संदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की,


- हा फक्त चाचणी संदेश (Test Message) आहे
- नागरिकांनी घाबरण्याची किंवा कोणतीही कृती करण्याची गरज नाही



ही प्रणाली इंटरनेटशिवायही थेट मोबाईल नेटवर्कद्वारे अलर्ट पाठवू शकते, त्यामुळे दुर्गम भागातही वेळेवर सूचना पोहोचवणे शक्य होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची ‘Cell Broadcast’ तंत्रज्ञान प्रणाली अनेक प्रगत देशांमध्ये आधीपासूनच वापरात आहे. आता भारतातही ही सुविधा सुरू होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





दरम्यान, अचानक आलेल्या या अलर्टमुळे अनेक नागरिक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना दिसले. काहींनी याला “नवीन आणि उपयुक्त पाऊल” म्हटले, तर काहींनी सुरुवातीला घाबरल्याचेही सांगितले.



सरकारकडून अशा प्रकारच्या चाचण्या पुढेही केल्या जाण्याची शक्यता असून, नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबठा गटावर घणाघात

दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा

Dadaji Bhuse : शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियान; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये काढणार चार दिवसांचा दौरा मुंबई : राज्यातील शाळांमधील मूलभूत

Shiv Sena party constitution : २०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले; सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद

४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती निवडणूक आयोगाच्या

jaykumar gore : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक; मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका

मुंबई : ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज बैठक घेऊन संबंधित मागण्यांचा

Mangal Prabhat Lodha : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना

• कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांशी संवाद मुंबई :

Mangal Prabhat Lodha : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एक महापालिका शाळा दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे; मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका