Dadaji Bhuse : शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियान; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये काढणार चार दिवसांचा दौरा


मुंबई : राज्यातील शाळांमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी केली. मुंबईतील बालभवन येथे आयोजित शिक्षण विभागाच्या ‘शिक्षण संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. बैठका आणि कागदी नियोजनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसले पाहिजे, असे स्पष्ट करत त्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन काम करण्याचे निर्देश दिले.



या कार्यशाळेस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागातील सर्व संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील आठही विभागांत वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, हे अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौऱ्यात शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या परिस्थितीचे मूल्यांकन करतील. शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि सुरक्षित परिसर या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जावे, तसेच बालवाटिका ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणिताचे मूलभूत कौशल्य भकम करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.



या उपक्रमांतर्गत चांगल्या काम करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन दिले जाईल, तर आवश्यक तिथे लोकसहभाग आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून तातडीने सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोषण आहार, गणवेश व विद्यार्थ्यांच्या सुविधांमध्ये कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान प्रधान सचिव देओल आणि आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनीही शाळा भेटींचे नियोजन आणि स्थानिक निधीचा प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबठा गटावर घणाघात

दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा

Shiv Sena party constitution : २०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले; सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद

४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती निवडणूक आयोगाच्या

jaykumar gore : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक; मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका

मुंबई : ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज बैठक घेऊन संबंधित मागण्यांचा

Mangal Prabhat Lodha : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना

• कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांशी संवाद मुंबई :

Mangal Prabhat Lodha : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एक महापालिका शाळा दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे; मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऑस्ट्रेलियातील ‘न्यू साउथ वेल्स’सोबत सामंजस्य करार

-वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि कौशल्य विकासासह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर; ९०