राजापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, राजापूर तालुक्याने पुन्हा एकदा आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा तालुक्याचा एकूण निकाल ९४.९८ टक्के लागला आहे.
या परीक्षेसाठी एकूण १२०२ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी तब्बल ११९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्तेनुसार पाहता,
६६ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत २२० विद्यार्थी प्रथम श्रेणीत ५६८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत २८२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
१००% निकाल देणारी महाविद्यालये:
इतर महाविद्यालयांचा निकाल:
राजापूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय – ९५.६०% पाचल – ९६.४२% वाटूळ – ९३.९३% ओणी – ९४.२३% नवजीवन, राजापूर – ९३.४१% आडिवरे – ९४.६४% जानशी – ८३.७२% नाटे – ८८.८८% नॅशनल महाविद्यालय – ९३.०२%
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक तसेच संस्थांचे पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात राजापूरचा दबदबा कायम :
एकूणच, या निकालामुळे राजापूर तालुक्याने ‘धवल यश’ाची परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.






