Jalgaon Heatwave : जळगाव उष्णतेच्या तडाख्याने केळी बागांचे नुकसान

जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरात वाढत्या तापमानामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असल्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः धावपळ करावी लागत आहे. प्रखर उन्हामुळे झाडे करपत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यावल तालुक्यातील हा परिसर तालुक्यातील बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. विशेषतः केळी शेतीवर येथील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, सध्याच्या तीव्र उष्णतेमुळे केळी बागांचे संरक्षण करणे आव्हानात्मक बनले आहे. पाण्याची कमतरता आणि योग्य वेळी सिंचन न झाल्याने झाडांची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे.



शेतकऱ्यांना आता सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा शेतीची कामे उरकावी लागत आहेत. दिवसभरातील कडक उन्हामुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे. त्यातच मजुरांची टंचाई असल्याने शेती कामे वेळेत पूर्ण होत नसल्याची तक्रारही शेतकरी व्यक्त करत आहेत. रब्बी हंगामात काही प्रमाणात उत्पादन मिळूनही आर्थिक स्थिती सुधारलेली नसल्याने खरीप हंगामाची तयारी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.



दरम्यान, बाजारात केळीच्या भावात वाढ झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून केळी कमी दरात खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसून आर्थिक अडचणी अधिकच वाढत आहेत. या सर्व समस्यांमध्ये भर म्हणजे वीज पुरवठ्याचे विस्कळीत वेळापत्रक. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास दिली जात असल्याने मोठी गैरसोय होत आहे. रात्री २.३० ते सकाळी १०.३० आणि दिवसा १०.३० ते सायंकाळी ५.३० अशा वेळेत वीज पुरवठा केला जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांना रात्री जागून शेतीची कामे करावी लागत असून त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.केळी बागा वाचवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत असताना, वीज पुरवठ्याच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली