सोमनाथ महोत्सवात काय म्हणाले PM Modi ?

सोमनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला. सोमनाथ मंदिर पुनरुज्जीवनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्यात त्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचा गौरव केला. यावेळी त्यांनी १९९८ च्या पोखरण अणुचाचणीचा संदर्भ देत भारताच्या सामर्थ्याचे आणि स्वाभिमानाचे जोरदार समर्थन केले.





पंतप्रधानांनी सांगितले की, ११ मे हा दिवस केवळ सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेचाच नाही, तर भारताच्या अणुचाचणीचाही ऐतिहासिक साक्षीदार आहे. "१९९८ मध्ये जगातील मोठ्या शक्तींनी भारतावर निर्बंध लावून आपल्याला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. दबाव इतका होता की इतर कोणताही देश झुकला असता, पण अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने नमण्यास नकार दिला. ११ मे नंतर १३ मे रोजी पुन्हा दोन चाचण्या करून भारताने आपली अढळ राजकीय इच्छाशक्ती जगाला दाखवून दिली," असे मोदी म्हणाले. "१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण १९५१ मध्ये सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेने भारताच्या मुक्त जाणीवेची घोषणा केली," असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या मते, सोमनाथ मंदिर हे केवळ इतिहासाचे प्रतीक नसून पुढील हजार वर्षांसाठी प्रेरणेचा उत्सव आहे.





तुष्टीकरणाच्या राजकारणावर प्रहार : पंतप्रधानांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मंदिर उभारणीसाठी मोठे प्रयत्न केले, पण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याला विरोध केला होता. "अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीला ज्या मानसिकतेने विरोध केला, तीच 'तुष्टीकरणाचे राजकारण' करणारी शक्ती आजही सक्रिय आहे. आपल्याला अशा संकुचित राजकारणापासून सावध राहावे लागेल," असा इशारा त्यांनी दिला.



वारसा आणि आधुनिकतेचा संगम : पंतप्रधानांच्या मते, भारतासाठी वारसा आणि आधुनिकता हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. "सांस्कृतिक केंद्रांच्या दुर्लक्षामुळेच भारताच्या प्रगतीत अडथळे आले होते, जे आता दूर केले जात आहेत," असे त्यांनी नमूद केले. या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात आले.



सोहळ्यातील विशेष क्षण : महापूजा: कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिरात 'महापूजा' केली. भगवान शिवाच्या या ज्योतिर्लिंगाच्या भव्य कळसाला ११ पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने अभिषेक करण्यात आला.


रोड शो : हेलिपॅडपासून वीर हमीरजी सर्कलपर्यंत सुमारे १.५ किमीचा भव्य रोड शो काढण्यात आला. हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत केले.

Comments
Add Comment

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा