NEET Exam 2026 : पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; NEET परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार!

मुंबई : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून नीट परीक्षा २०२६ ची (NEET 2026) नवी तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पेपरफुटीच्या गंभीर आरोपांमुळे ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, भीती आणि प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता अखेर आयोगाकडून नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

देशभरात २ मे २०२६ रोजी नीट परीक्षा पार पडली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच पेपरफुटीचे गंभीर आरोप समोर आले. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली. सुरुवातीला काही राज्यांमधून संशय व्यक्त करण्यात आला, मात्र नंतर राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर आणि लातूरपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याचे समोर आले. काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत असून काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.



हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर मानत केंद्र सरकारने तात्काळ हालचाली सुरू केल्या. प्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने प्राथमिक चौकशीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे संकेत दिल्यानंतर परीक्षा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आता नीट परीक्षा २०२६ची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ जून २०२६ (21 June 2026) रोजी देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. आयोगाने अधिकृत घोषणा करत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तयारीसाठी वेळ दिला आहे. मात्र, परीक्षा पुन्हा द्यावी लागणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणावाचे वातावरण कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलनं आणि नाराजी व्यक्त केली जात होती.

या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक तब्बल दोन तास चालली. बैठकीत नीट आणि नेट परीक्षेतील पेपरफुटी, सुरक्षा व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.



या बैठकीला उच्च शिक्षण सचिव सचिन विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह, राहुल सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयोगाने यापूर्वीच सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे स्पष्ट केले आहे.

तपासादरम्यान नाशिकहून राजस्थानपर्यंत आणि राजस्थानहून हरियाणापर्यंत पेपर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. काही मोठी नावेही या प्रकरणात समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे.

आता २१ जून रोजी होणारी नीट परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी केंद्र सरकार आणि आयोगाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या परीक्षेशी जोडलेले असल्याने प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा