Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात झालेल्या हलगर्जीपणा आणि वेळेत प्रतिबंधक कारवाई न केल्याने खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


माहितीनुसार निलंबितांमध्ये पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर, टाऊन बिट प्रभारी सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.



नेमके प्रकरण काय ?


या प्रकरणाची सुरुवात झाली १ मे रोजी. बोदवड पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तक्रारीमध्ये गंभीर वाद निर्माण झाल्याने या पार्श्वभूमीवर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद वाढला. पुढे काही चुकीचे कृत्य गडू नये आणि तणाव कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी याची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखूनही कोणतीही चौकशी किंवा कारवाईची तत्परता दाखवली नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष अधिक वाढत गेला आणि अखेर खुनासारखी गंभीर घटना घडली.


दरम्यान, सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ हे बोदवड शहराचे टाऊन बिट प्रभारी म्हणून कार्यरत होते. १९ मे रोजी ते दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोकॉ मोहन चौधरी यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले होते. संबंधित दोन्ही गटांतील वाढत्या वैमनस्याची पूर्ण माहिती असूनही त्यांनी केवळ दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यामध्ये आणून कोणतीही कायदेशीर अथवा प्रतिबंधक कारवाई न करता सोडून दिले. या निष्काळजीपणामुळे २१ मे रोजी गंभीर गुन्हा घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.



या संपूर्ण प्रकरणात पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यावरही गंभीर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. १९ मे रोजी हिदायत नगर परिसरातील वादाची सविस्तर माहिती पोकॉ मोहन चौधरी यांनी त्यांना फोन तसेच व्हॉट्सॲपद्वारे दिली होती. स्थानिक नगरसेवकाने देखील परिसरातील संवेदनशील परिस्थितीबाबत त्यांना सतर्क केले होते. मात्र, इतकी गंभीर माहिती मिळूनही त्यांनी स्वतः कोणतीही तातडीची कारवाई केली नाही किंवा अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य सूचना दिल्या नाहीत.


तसेच वरिष्ठ कार्यालय किंवा नियंत्रण कक्षालाही वेळेत माहिती देण्यात आली नाही. परिणामी, परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा