मुंबई : राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या २९ मेपर्यंत राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Monsoon 2026)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सूनची वाटचाल अनुकूल असून जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील तापमानातही घट होणार असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Monsoon 2026)
मुंबईसह राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दादरमधील शिवाजी पार्क परिसरासह अनेक भागांत हलक्या सरी कोसळल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Monsoon 2026)
दरम्यान, राज्यातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थितीही चिंतेचीच आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये एकूण ३०.५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जायकवाडी धरणात ३७ टक्के, खडकवासला धरणात ५७.४७ टक्के, तर कोयना धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. (Monsoon 2026)