मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठीचे धिंडवडे!

मुंबई : राज्यातील परप्रांतीय रिक्षा, टॅक्सी आणि ‘उबर’ चालकांना मराठी लिहिता-वाचता आले पाहिजे, यासाठी आग्रह धरला जात असताना, दुसरीकडे ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, त्याच मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मराठी भाषेचे अक्षरशः धिंडवडे निघत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मंत्रालयाच्या 'गार्डन गेट'वर लावण्यात आलेल्या एका सूचनाफलकावर धड एक वाक्यही व्याकरणदृष्ट्या शुद्ध लिहिता आलेले नाही. त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.मागील अनेक दिवसांपासून हा अर्थहीन आणि अशुद्ध सूचनाफलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर दिमाखात झळकत असून, राज्याला दिशा दाखवणाऱ्या मराठी भाषा विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यासाठी 'गार्डन गेट'च्या बाहेर एक फलक लावण्यात आला आहे. या फलकावर “मंत्रालय प्रवेश करीता ०२.०० वाजल्यांचे रांग येथुन चालु” असे अत्यंत चुकीचे आणि व्याकरणशून्य वाक्य लिहिण्यात आले आहे.



मराठी भाषेच्या नियमांनुसार हे वाक्य जर शुद्ध स्वरूपात लिहायचे झाले, तर ते ‘मंत्रालयात प्रवेशाकरिता दुपारी २ वाजल्यापासून येथून रांग लावावी’ असे असायला हवे होते. मात्र, या फलकावरील वाक्यात शब्दांची आणि व्याकरणाची अशी काही मोडतोड करण्यात आली आहे की, त्याचा धड अर्थ लावणेही कठीण झाले आहे.

मराठी भाषाप्रेमींचे 'सौजन्य' हरवले?
 राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो नागरिक विविध कामांनिमित्त मंत्रालयात येत असतात. हा फलक वाचून वाक्य चुकीचे असले तरी, नागरिक त्यातून कसातरी स्वतःचा अर्थ काढतात आणि रांगेत उभे राहतात. मात्र, मंत्रालयात ये-जा करणाऱ्या मराठी भाषा विभागातील उच्चपदस्थ अधिकारी, कर्मचारी किंवा स्वतःला 'मराठी भाषाप्रेमी' म्हणवून घेणाऱ्या एकाही कथित नेत्याला हा अशुद्ध फलक बदलण्याचे सौजन्य दाखवावेसे वाटले नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच राज्याच्या मातृभाषेची अशी दुरवस्था होत असेल, तर सर्वसामान्यांनी आणि परप्रांतीयांनी मराठीचा आदर कसा करावा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. हा वादग्रस्त आणि चुकीचा फलक तातडीने बदलून तिथे प्रमाण मराठीतील फलक लावला जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४