NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश; १० ते १२ लाखांत विकला जात होता पेपर

लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील धागेदोरे आता लातूरमध्ये अधिकच मजबूत होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) पथक गेल्या अनेक दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे. मंगळवारी सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित आणखी एका डॉक्टरची चौकशी केली. यासोबतच शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या बॅचमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.



तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर आणि एनटीएमधील केमिस्ट्री विषयाचा पेपर सेटर पी. व्ही. कुलकर्णी यांनी NEET परीक्षेचा पेपर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना लाखो रुपयांत विकल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या हाती लागलेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदींमधून अनेक पालकांनी मोटेगावकर आणि कुलकर्णी यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित केल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवहारांचे डिजिटल पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध झाले आहेत.



सीबीआयच्या प्राथमिक तपासात पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांनी मिळून NEET परीक्षेचा पेपर तब्बल १०ते १२ लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या व्यवहारांशी संबंधित ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे भक्कम पुरावे तपास यंत्रणेला मिळाले आहेत. विशेष म्हणजे, ज्यांनी हा पेपर खरेदी केला त्या काही पालकांनी पुढे आपल्या नातेवाईकांना आणि परिचितांना २ ते १० लाख रुपयांच्या मोबदल्यात तोच पेपर विकल्याची माहितीही समोर आली आहे. तपासात शहरातील काही नामांकित डॉक्टरांनी आपल्या मित्रांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या मुलांपर्यंत हा पेपर पोहोचवल्याचेही उघड झाले आहे.


ऑनलाईन व्यवहारांमुळे आरोपी अडचणीत


या संपूर्ण प्रकरणात डिजिटल व्यवहार आरोपींसाठी मोठी अडचण ठरत आहेत. अनेक पालकांनी पेपर खरेदीसाठी लागणारी रक्कम थेट ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केली होती. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद उपलब्ध असून सीबीआयला तपासासाठी महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. काही पालकांनी आपल्या पत्नींच्या किंवा मुलांच्या बँक खात्यांमधून थेट प्रा. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्या खात्यावर पैसे पाठवले होते. या सर्व आर्थिक व्यवहारांची सध्या सखोल पडताळणी सुरू आहे.



दरम्यान, लातूर शहरातील नामांकित रुग्णालयांशी संबंधित पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केली आहे. यापैकी चार डॉक्टरांच्या मुलांनी यंदाची NEET परीक्षा दिली होती. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय पुढे चालवण्यासाठी आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावे, या इच्छेपोटी काही डॉक्टरांनी पेपर खरेदी केला असावा, असा संशय तपास यंत्रणेला आहे.


याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांच्याकडून आणलेल्या प्रश्नपत्रिका जप्त करण्यात येत आहेत. कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले प्रश्न आणि प्रत्यक्षात फुटलेले प्रश्न यांची तुलना करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक नोट्सही सीबीआयने ताब्यात घेतल्या आहेत. NEET पेपरफुटी प्रकरणातील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी सीबीआयचे पथक सध्या लातूरमध्ये कसून तपास करत असून येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा