Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी





 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 'स्वग्राम' (Swagram) बदलण्यासंदर्भातील नियमांमध्ये सुधारणा करत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विवाह, कौटुंबिक कारणे, स्थलांतर किंवा इतर वैयक्तिक अडचणींमुळे स्वग्राम बदलण्याची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वी शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना स्वग्राम घोषित करणे बंधनकारक होते. एकदा स्वग्राम निश्चित केल्यानंतर सेवाकाळात केवळ एकदाच त्यामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जात होती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बदललेल्या परिस्थितीनुसार स्वग्राम बदलता येत नव्हता.

विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना या नियमाचा अधिक फटका बसत होता. विवाहानंतर राहण्याचे ठिकाण बदलूनही अनेकांना अधिकृत नोंदींमध्ये बदल करता येत नव्हता. परिणामी काही शासकीय सुविधा आणि सवलतींचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या.





नवीन निर्णयानुसार, विवाह, घटस्फोट, वैधव्य, पुनर्विवाह किंवा परित्यक्ता अशा विशेष परिस्थितींमध्ये महिला कर्मचाऱ्यांना स्वग्राम बदलण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी स्वग्राम घोषित करून एकदा बदल केला आहे, त्यांनाही आणखी एकदा बदल करण्याची संधी मिळणार आहे.

सुधारित नियमांनुसार, नियुक्तीनंतर ६ महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित करणे आवश्यक राहणार आहे. मात्र त्यानंतर बदलासाठी अधिकृत अर्ज करावा लागेल. संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतरच बदलाची नोंद सेवापुस्तकात करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरत असून सेवासुविधांचा लाभ घेणे आता अधिक सोपे होणार आहे.




 



Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा