Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. जामनेर (Jamner) तालुक्यात पोलिसांनी धडक कारवाई करत अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेल्या कापूस बियाण्यांच्या मोठ्या साठ्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ९ लाख १५ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त


जामनेर शहरातील साईनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कापूस बियाण्यांचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत दीपक राजमल चौधरी यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यात घरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला.


तपासादरम्यान ४० गोण्या आणि तब्बल १ हजार १६ बियाण्यांची पॅकेट्स जप्त करण्यात आली. या पॅकेट्सवर विविध कंपन्यांची नावे, बॅच क्रमांक आणि उत्पादनासंबंधी माहिती नमूद करण्यात आली होती. मात्र संबंधितांकडे बियाण्यांची विक्री, साठवणूक आणि वितरणासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचं तपासात उघड झालं.



पुरवठादार कोण ?


याशिवाय, जप्त बियाण्यांची खरेदी कुठून करण्यात आली? पुरवठादार कोण होता? आणि ही बियाणे अधिकृतरीत्या विक्रीसाठी मंजूर होती का? याबाबतही समाधानकारक माहिती संशयितांकडून देण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणामागे मोठं अवैध वितरण जाळं कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. जप्त बियाण्यांमध्ये ‘दिया-५९’ वाणाची ४५० पॅकेट्स आणि ‘क्रीश-४५’ वाणाची ५६६ पॅकेट्स असल्याचं समोर आलं आहे. पंचनाम्यानुसार या सर्व साठ्याची किंमत ९ लाखांहून अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.


कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी (Agriculture Department Officers) इशारा दिला आहे की, अशा प्रकारची अनधिकृत किंवा बनावट बियाणे बाजारात पोहोचल्यास त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. कमी उगवण क्षमता, उत्पादनात घट, पीक नुकसान आणि मोठं आर्थिक नुकसान अशा संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागू शकतं. विशेषतः कापूस हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचं नगदी पीक असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.



अहवालानंतर मोठे खुलासे होणार ?


या प्रकरणी पंचायत समितीच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दीपक राजमल चौधरी, गुलाब आधार पाटील, शेषराव पाटील आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांवर शेतकऱ्यांची फसवणूक, अनधिकृत बियाणे साठवणूक आणि विक्रीचे आरोप ठेवण्यात आले असून, बीएनएस २०२३, बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या जप्त बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, अहवालानंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.