Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार


मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ, महापूर आणि बाजारभावातील चढउतारामुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारने अलीकडेच केली आहे. त्यानुसार, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढील १० दिवसांत सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatray Bharne) यांनी सोमवारी दिली आहे.


महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ केले जाणार आहे. या महाकर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा प्रचंड आर्थिक भार पडणार आहे. बँका आणि सहकारी संस्थांकडून आलेली आकडेवारी आणि डेटा संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने, ३० जूनच्या आधी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ पोहोचवण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. (Agriculture Minister Dattatreya Bharane)



कर्जमाफीच्या प्रक्रियेविषयी बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, ही योजना सर्वसमावेशक करण्यात आली आहे. केवळ थकबाकीदारांचेच कर्ज माफ होणार नाही, तर प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी आणि अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांना या कक्षेत आणण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून राज्यातील एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (Agriculture Minister Dattatray Bharne)



शेतकऱ्यांना बळ देणे ही नैतिक जबाबदारी :


गेल्या काही हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातच साखर उद्योगासमोरील अडचणींमुळे ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम मिळण्यातही विलंब होत होता. अशा दुहेरी संकटात अडकलेल्या बळीराजाला संपूर्ण कर्जमुक्त करून पुन्हा उभे करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असे भरणे म्हणाले. या योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे ठेवण्यात आले असून, भविष्यात तरुण आणि मेंढपाळ समाजासाठीही अशाच प्रकारे थेट लाभ देणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Agriculture Minister Dattatray Bharne)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा