Flyover accident : छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात ; ३५ प्रवासी जखमी

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर ते वाळूज मार्गावरील छावणी उड्डाणपुलावर रात्री ११.३० वाजता एका खासगी कंपनीच्या बसचा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये एका कंपनीचे ३५ कर्मचारी प्रवास करत होते. दुसऱ्या शिफ्टनंतर कंपनीतील कामगारांना घरी घेऊन जाणारी ही खासगी बस उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीवर जोरात धडकली.या अपघातात बस चालक जाधव यांचा मृत्यू झाला असून जवळपास 35 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.



अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की चालक बसच्या केबिनमध्ये अडकला होता. नागरिकांच्या मदतीने बस चालकाला बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून सर्व जखमींना विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.



बसमधील प्रवासी वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीचे कामगार होते,अशी माहिती काही कामगारांनी दिली.अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा