Raigad Crime : रायगडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून हत्या; संशयित आरोपी ताब्यात













Raigad Crime : रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटनेश्वर आदिवासी वाडीत 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिया सागर वाघमारे असे मृत बालिकेचे नाव आहे.



प्राथमिक माहितीनुसार, रिया बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळाने तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. (Raigad)



या प्रकरणात पोलिसांनी किरण भिकू वाघमारे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अपहरण (Kidnapping) आणि हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


या घटनेमुळे पाटनेश्वर आदिवासी वाडीसह संपूर्ण पेण तालुक्यात शोककळा पसरली आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. (Crime News)








Comments
Add Comment

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य