Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण दुर्घटना! गोव्याहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ३ जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा रेस्ट हाऊसजवळ बुधवारी (१५ जुलै) सकाळी झालेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)



डंपरला कारची जोरदार धडक :


माहितीनुसार, मुंबईतील आग्रीपाडा परिसरात राहणारे हे कुटुंब गोव्यातून फिरून क्रेटा कारने मुंबईकडे परतत होते. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास लांजा रेस्ट हाऊसजवळ त्यांच्या कारने पुढे जात असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की क्रेटा कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात कारमधील दोन महिला आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)



जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू :


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)



परतीचा प्रवास ठरला अखेरचा :


गोव्यातील सहल आटोपून आनंदाने मुंबईकडे निघालेल्या या कुटुंबावर काही क्षणांतच काळाने घाला घातला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा