‘Aaple Sarkar Seva Kendra’ : आता नक्षली भागातही ‘आपले सरकार सेवा केंद्रे’

राज्य सरकारचा निर्णय; नक्षली चळवळ कमकुवत झाल्याचे द्योतक, नागरिकांची पायपीट थांबणार


मुंबई : नक्षली कारवायांमुळे वर्षानुवर्षे उपेक्षित आणि विकासापासून दूर राहिलेल्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि जंगलव्याप्त भागासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अशा अत्यंत संवेदनशील २२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. नक्षलवाद्यांच्या धाकामुळे आणि प्रभावामुळे ज्या भागांत साध्या शासकीय सुविधा पोहोचवणे देखील प्रशासनासाठी आव्हानात्मक बनले होते, तिथे आता शासकीय सेवा केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. नक्षली चळवळ कमकुवत होत असल्याचे आणि त्या भागात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट होत असल्याचेच हे मोठे द्योतक मानले जात आहे.



गडचिरोली जिल्ह्यातील या अतिदुर्गम भागातील नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे किंवा छोट्या-छोट्या शासकीय कामांसाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागत होता. वाहतुकीच्या साधनांचा अभाव आणि घनदाट जंगलाचा रस्ता यामुळे येथील गरिबांना मोठी पायपीट करावी लागत होती, ज्यामध्ये त्यांचा वेळ आणि कष्टाने मिळवलेला पैसा दोन्ही वाया जात होते. मात्र, आता ही २२ केंद्रे सुरू होणार असल्याने सर्व प्रमुख शासकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.



नक्षलवादावर विकासाचा प्रहार


ज्या भागात नक्षलवादी समांतर व्यवस्था चालवण्याचा प्रयत्न करत होते, तिथे आता शासकीय सेवा केंद्र सुरू करून सरकारने विकासाच्या माध्यमातून नक्षलवादावर प्रहार केला आहे. या केंद्रांमुळे दुर्गम भागातील आदिवासी आणि ग्रामीण जनतेचा प्रशासनाशी संपर्क वाढणार असून, शासकीय योजनांचा लाभ मिळणे अधिक सुलभ होणार आहे. प्रशासकीय प्रक्रियेतील गतिमानतेसोबतच हा निर्णय गडचिरोलीच्या परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई