Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. (Maharashtra Rain)


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुलनेने कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Rain Alert)



अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरड कोसळण्याचाही धोका व्यक्त करण्यात आला आहे. (Monsoon Update)


29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने पूर्व विदर्भात जाणवेल. 30 जुलै रोजी पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर 31 जुलै रोजी खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. (IMD Alert)


मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातही 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. सखल भाग, नदी-नाल्यांच्या परिसरात तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (Rain Forecast)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा