Nashik-Pune Elevated Corridor : नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉरला वेग; लोकसभेत नितीन गडकरींची मोठी घोषणा, २०३०-३१ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

Nashik-Pune Elevated Corridor : नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) भीषण वाहतूक कोंडी, वाढते अपघात आणि रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा आता थेट लोकसभेत गाजला आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी हा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारकडे महामार्गाच्या सुधारणांबाबत आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या सद्यस्थितीबाबत माहिती मागितली. (Nashik-Pune Elevated Corridor)



रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा लोकसभेत


लोकसभेत बोलताना खासदार वाजे (MP Rajabhau Waje) यांनी नाशिक-पुणे महामार्ग हा नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगितले. कृषी उत्पादनांची वाहतूक, औद्योगिक मालाची ने-आण, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी दररोज लाखो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, नाशिक-पुणे महामार्गावर राजगुरूनगर, मोशी, चाकण आणि आळेफाटा परिसरात कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होते. सध्या काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याने एकाच बाजूने दोन्ही दिशांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागत असल्याचे वाजे यांनी सांगितले. तसेच, नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या (Nashik-Pune Elevated Corridor) कामाला अद्याप गती मिळालेली नसल्याची बाबही त्यांनी लोकसभेत मांडली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. (Nashik-Pune Elevated Corridor)



नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉरला वेग


यावर उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील विविध जंक्शनची सुधारणा आणि वाहतूक व्यवस्थापनाची कामे सुरू असल्याची माहिती दिली. विशेषतः चाकण आणि खेड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, या मार्गावरील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ७,८०१ कोटी रुपये खर्चून आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (Elevated Corridor) उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून २०३०-३१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याची माहिती गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी लोकसभेत दिली. या प्रकल्पामुळे भविष्यात नाशिक-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र