नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, वाघ संवर्धनाच्या क्षेत्रात भारताने आपले जागतिक नेतृत्व अधिक भक्कम केले आहे. सध्या जगातील सुमारे ७५ टक्के वाघ भारतात आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, देशातील ५८ व्याघ्र प्रकल्पांमध्ये (टायगर रिझर्व्ह) वाघांची संख्या ३,६८२ वर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त बुधवारी 'एक्स'वरील पोस्टमध्ये यादव यांनी म्हटले की, वाघांच्या वाढत्या संख्येमुळे भारतातील जंगलांची सुधारलेली स्थिती आणि वन्यजीव संवर्धनासाठी सातत्याने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे प्रमाण मिळते. ही कामगिरी देशातील संवर्धनविषयक धोरणे आणि उपक्रम प्रभावी ठरल्याचे दर्शवते.ते पुढे म्हणाले की, वाघ आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारची बांधिलकी यापुढेही कायम राहील. तसेच जंगलांशी संबंधित स्थानिक समुदायांचे उपजीविकेचे साधन अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले जातील.