Orange Alert : IMD चा ऑरेंज अलर्ट! मुंबईसह महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांत पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी १० वाजता नाऊकास्ट इशारा (Nowcast Warning) जारी केला आहे. हा इशारा पुढील काही तासांसाठी वैध असून राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.

IMD च्या अंदाजानुसार, मुंबई, रायगड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बीड, अहिल्यानगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी (Moderate to Intense Rain Spells) पडण्याची शक्यता आहे.



हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सखल भागात पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनानेही नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा