Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट, नाशिक-नंदुरबारमध्ये शाळांना सुट्टी

मुंबई : राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, 1 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)



'या' जिल्ह्यांता ऑरेंज अलर्ट जारी


रायगड, नाशिक घाट परिसर आणि पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट भागात सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा आणि वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Yellow Alert)



नाशिककरांना सावधानतेचा इशारा


नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आल्याने मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


नंदुरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



मुंबई शहरात रिमझिम


दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शहरात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने डहाणू ते श्रीवर्धनदरम्यानच्या बंदरांवर स्थानिक सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon)




Comments
Add Comment

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड