Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश


मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत कृषी निविष्ठा वाटपात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार आणि गंभीर अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. या घोटाळ्याप्रकरणी १५ कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.


केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत (२०२५-२०२६) एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या योजनांच्या अंमलबजावणीसाठी धाराशिव जिल्ह्यात सुमारे २४ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, या प्रक्रियेत प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीला डावलून गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप झाला होता. तपासादरम्यान मृत शेतकरी तसेच कागदोपत्री बनावट लाभार्थी तयार करून कोट्यवधी रुपयांच्या निविष्ठा कागदावरच वाटल्याचे दाखवण्यात आल्याचे समोर आले.


या घोटाळ्याची गंभीर दखल घेत कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. निलंबित करण्यात आलेल्या १५ अधिकाऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रशासकीय अनियमिततेसोबतच आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी केली जाणार आहे.

राज्यभरातील कृषी यंत्रणेला इशारा


शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा कृषीमंत्र्यांनी दिला आहे. या चौकशीत आणखी काही वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदारांचे लागेबांधे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, चौकशी अंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री भरणे यांच्याकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा