CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विधानसभा अध्यक्ष यांनी पत्र दिले. (Rahul Narwekar)


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे केवळ देशातील महत्त्वाचे ऐतिहासिक रेल्वे स्थानक नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचे प्रतीक आहे. या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असून, देशभरातून दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा संदेश देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने ही उद्घोषणा महत्त्वपूर्ण ठरेल, असे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. (CSMT)



सीएसएमटी येथून सुटणाऱ्या तसेच या स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीच्या उद्घोषणांमध्ये नियमित रेल्वे माहितीबरोबरच “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणा समाविष्ट करण्यात याव्यात, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व समाजघटकांना सोबत घेतले. त्यांचे प्रशासन, शौर्य, लोककल्याणकारी धोरणे आणि राष्ट्रहिताची भूमिका आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी अशा उपक्रमांना महत्त्व आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.


सीएसएमटी हे मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकावरून देशाच्या विविध भागांत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये होणाऱ्या उद्घोषणांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केल्यास त्यांच्या कार्याचा संदेश महाराष्ट्राबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित रेल्वे प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात आणि सीएसएमटी येथून येणाऱ्या व निघणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत या उद्घोषणा करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. (Ashwini Vaishnaw)


या मागणीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या विचारांचा जयघोष रेल्वेच्या माध्यमातून देशभर पोहोचविण्याचा एक अभिनव उपक्रम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा