- सभागृहात उपहारगृह बंदीवरून तीव्र नाराजीचे उमटले सूर
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेतील उपहारगृहात ताकामध्ये माशी सापडल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने (FDA) कायदेशीर नोटीस पाठवून हे उपहारगृह बंद करण्यात आले. परंतु हे बंद करण्यात आलेले उपहारगृह सुरु करण्यात आले नसून याचा तीव्र पडसाद मंगळवारी महापालिका सभागृहात उमटले. सभागृह सुरु असताना त्याठिकाणी नगरसेवकांसाठी खाण्यापिण्याची काहीही व्यवस्था नव्हती. उपहारगृह बंद म्हणून ही सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या शिस्तीमुळे नगरसेवकांना उपाशी ठेवणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांनी त्वरीत याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले.
मुंबई महापालिका (BMC) सभागृह सुरु असताना माजी महापौर विशाखा राऊत यांनी पहिल्या बैठकीपासून आम्ही सांगतोय की कुणी तरी निविदा किंवा निविदा न मागवता एखादा कॅन्टीनवाल्याला नियुक्त करून नगरसेवकांसाठी सभागृहाच्या दिवशी खानपानाची व्यवस्था करावी. परंतु आता उपहारगृहच बंद आहे म्हणून नगरसेवकांना सभागृहाच्या दिवशी मिळणारी सेवाही बंद आहे. यातील सर्वांत जास्त नगरसेवकांना मधुमेहीचे आजार आहे. त्यांना वेळेत खावे लागते. ते उपाशी राहू शकत नाही. त्यामुळे ते सभागृहाच्या बाहेर जात आहेत. त्यामुळे पुढील सभागृहापूूर्वी नगरसेवकांसाठी याठिकाणी खानपान सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी आरामचा वडापाव किंवा ठक्करची सेवा दिली जावी.
जोपर्यंत उपहारगृहासाठी चालकाची निवड होत नाही तोपर्यंत ही सेवा मिळायला हवी असे सांगितले. तर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी अन्न व औषध प्रशासनाने नक्की नोटीस का दिली? याबाबत कामगार अधिकाऱ्यांना अहवाल सादर करायचे निर्देश दिले तरीही ते दिले जात नाही. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीमुळे सभागृहातील नगरसेवकांनी उपाशी राहायचे का? कामगारांनी उपाशी राहायचे का? त्यांच्या ज्या काही अटी असतील त्यानुसार पुढील कार्यवाही पूर्ण करा, पण एवढा बेफिकीरपणा का दाखवला जात आहे असा सवाल करत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर यावर महापौरांनी आपण त्यांचे जुने करार संपल्याशिवाय दुसरा ठेवू शकत नाही, मग तात्पुरता का ठेवू शकत नाही, त्यामुळे लवकरात लवकर याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्देश महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांनी दिले.






