Vande Mataram Controversy : काँग्रेसने 'वंदे मातरम'बाबत मंजूर केलेला ठराव संविधानविरोधी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात; राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरही साधला निशाणा


मुंबई : काँग्रेस पक्षाने 'वंदे मातरम' राष्ट्रीय गीताबाबत मंजूर केलेला ठराव पूर्णपणे संविधानविरोधी असून, स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय अमान्य करणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.


काँग्रेस पक्षाने 'वंदे मातरम'बाबत नुकताच एक ठराव मंजूर करत या गीताची दोन कडवीच गाण्याबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, आता देशात ब्रिटिशांचे राज्य नसून, स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला प्रत्येक निर्णय हा संवैधानिक असतो. मात्र, संसदेचा निर्णय मानणार नाही आणि गुलामीची परंपरा कायम ठेवू, असा पवित्रा काँग्रेस घेत असल्याचे यातून दिसून येते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.



काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रो की गुंज' या कार्यक्रमावरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. राहुल गांधी यांनी सरसकट सर्वसामान्य तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद झाला असता, मात्र माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेत्यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्याद्वारे संचालित महाविद्यालयांमधील मुलींचेच रजिस्ट्रेशन करून त्यांना या कार्यक्रमात आणले जात आहे, असा दावा त्यांनी केला.


यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतच्या निकषांचा पुनरुच्चार केला. योजनेच्या लाभासाठी करण्यात आलेल्या छाननीमध्ये आयकर भरणाऱ्या कुटुंबांचे अर्ज नियमात बसत नसल्याचे स्पष्ट झाले असून, पात्र आणि शंभर टक्के व्हेरिफाईड ठरलेल्या महिलांना सरकार असेपर्यंत नियमितपणे लाभ मिळत राहील, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Comments
Add Comment

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई